प्रियाली,
कथेच्या पहिल्या भागातच तुम्ही ही कथा सांगण्यामागचा हेतू स्पष्ट केला आहे आणि त्यामध्ये तुम्ही सफलही झाला आहात.
पतिपत्नीचे न पटणे किंवा त्यांनी विभक्त होणे ह्या घटनांमध्ये बहुतेक वेळा सहानुभूती स्त्रीकडेच जाते. पुरूष हाच अत्याचार करणारा असा सर्वसाधारण समज असतो. परंतु स्त्रीची चूक असण्याची उदाहरणेही तुरळक का होईना आढळतात. तुमची कथा हे याचेच उदाहरण आहे.
तुम्ही म्हटले आहे -फसवला गेलेला पुरुष एकलकोंडा होऊन जातो. कुणाकडे तरी आपलं मन मोकळं करायला सर्वच पुरुषांना अजूनही शक्य होत का याबाबत मी थोडी साशंक आहे.
ह्या संदर्भात मला कुठेतरी वाचलेले एक वाक्य आठवत आहे. - स्त्रियांना रडू आले तर त्यांना पदराने डोळे पुसता येतात पण पुरुषाला रडता येत नाही कारण त्यांच्याजवळ डोळे पुसायला पदरच नसतो!
-मीरा
अवांतर
वरील वाक्य आपल्या सामाजिक संकेतांवर भाष्य करते. तरी त्यातील लक्ष्यार्थ समजून घ्यावा. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन 'हल्ली बायकांजवळ तरी पदर कुठे असतो' किंवा 'पुरुषांनी रुमालाने डोळे पुसावेत' असे प्रतिसाद कृपया देऊ नयेत ही कळकळीची विनंती.