पण नुसते, "जपा", "काळजी घ्या" वगैरे दिलेले सल्ले वाचून उद्विग्नता आली.
क्षमा करा. आपण आपल्या व्यक्तीरेखेत महिती दिली नसल्याने आपण मुंबईकर आहात की नाही हे कळले नाही. पण मी मुंबईकर आहे आणि नुकत्याच घडलेल्या घटनेवर तत्परतेने प्रियालीने केलेल्या लेखनामुळे 'जपा', काळजी घ्या' असे आलेले प्रेमळ सल्ले आम्हाला धीर देऊन गेलेत. ज्यांना कधी पाहिलेही नाही अश्यांनीही आमची विचारपूस केली आणि सदिच्छा व्यक्त केल्या हे आम्हा मुंबईकरांना सुखावून गेले. आपण त्यामुळे उद्विग्न का झालात हे कळले नाही.
त्या प्रेमाच्या शब्दांमुळे नव्हे, पण त्यापलीकडे जाऊन चर्चा न करण्याचा एकंदर प्रकार पाहून या चर्चास्थळाची मर्यादा कळली.
आपण प्रियालीच्या लेखनातील 'नाम्या' च्या प्रतिसादाबद्दल हे बोलत असाल तर मुंबईकरांच्या वतीने एव्हढेच सांगू इच्छिते की ह्या लेखनाचीही एक मर्यादा होती. नाम्यांनी त्याचे भान ठेवले नाही. त्यांचा उपरोध समजून त्यावर चर्चा करण्याच्या मनस्थितीत त्यावेळी कुणी नव्हते आणि ती वेळही नव्हती. आपला रोख जर तिकडे नसेल तर नाम्याच्या प्रतिसादाला आपण समजही दिली नाही, जी खेडूतांनी दिली. चर्चास्थळाची कसली मर्यादा? मांडा ना गंभीर विषय! करू आपण गंभीर चर्चा. पण आपल्या पदार्पणानंतरच्या कलावधीत आपण कुठल्या गंभीर चर्चेत सहभागी झाल्याचे निदान मला तरी आढळून आले नाही. खरंच आहे का आपल्याला रस गंभीर चर्चांमध्ये? की आपण तिकडे भेकडपणे वेगळ्या नावाने लिहिता?
खूप भेकडपणा आहे. अगदी वेगळया नावांआडून लिहिताना देखील.
नाम्या आणि आपण एकच का? पहिलाच लांबलचक प्रतिसाद त्यांचाच आहे म्हणून आपली शंका आली. असाल तरी दोघांपैकी कुणीही भेकड नाही बरं का! कारण फारच धाडसी लिखाण केलंय आपण!
मी ज्ञानी आणि बाकी सर्व अज्ञानी असे समजत नाही, तरीही, राहून राहून वाटते, की आपल्या मराठी लोकांमध्ये खूप अज्ञान आहे.
अहो, म्हणजे तमाम मराठीजनांना अज्ञानी म्हणालातच की. मग तुमच्या पहिल्या वाक्याचा अर्थ तरी काय?
छाया