कथा वाचणाऱ्या आणि उत्स्फुर्त प्रतिसाद लिहिणाऱ्या सर्व मनोगतींचे मनापासून आभार.
ज्या मनोगतींनी व्य. नि. तून आपले म्हणणे मांडले त्यांचे ही खूप आभार.
हिम्मत आणि अभिजीत,
समाज तसा बदलतोय. त्यामुळे अशा प्रशांतचे पुनर्विवाह होणे अशक्य राहिलेले नाही. परंतु बदनामी, चर्वित चर्चा, कुत्सित प्रतिक्रिया या सर्वांतून गेलेल्या एखाद्याचे पुन्हा या जंजाळात फसायला नको असे पक्के मतही बनू शकते. काळ नावाचे औषधच या कथेसाठी उपयुक्त आहे.