तरीही, राहून राहून वाटते, की आपल्या मराठी लोकांमध्ये खूप अज्ञान आहे.  आणि खूप भेकडपणा आहे.  अगदी वेगळया नावांआडून लिहिताना देखील. 

सुहासिनीताई - आपल्या भावना समजल्या असे छातीठोकपणे म्हणता येत नाही. पण रोख थोडाफार कळला. तरीही संभ्रम आहेच...

तो हा असा -

'मी' मनोगती आहे... मराठी आहे... वेगळ्या नावाने लिहितो....
मला जरा हा 'भेकडपणा' 'भेकडपणा' म्हणतात त्याची ओळख करून देता काय?

येथे "मी" हे अनेकवचन आहे... असेही मानायला काहीच हरकत नाही.