मी बुद्धिप्रामाण्यवादावर विश्वास ठेवणारा माणूस आहे.
माणूस आणि माकड यात एवढाच फरक आहे की माणूस विचार करतो आणी मग कृती करतो; जे माकड अथवा इतर कुठलाही प्राणी करू शकत नाही.
या असल्या बुवाबाजी, चमत्कारांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःची अधोगती करून माकड श्रेणीत जाऊन बसणे होय.
----
ह्या पवित्र लोकांना समजण्या करता, त्यांनी सांगितलेल्या प्रमाणे जीवन जगा
आणी पाहा, प्रत्यय येतो का नाही ते. पण ते करायची हिंमत आहे कोणाला? वाद
घालणे सोपे म्हणून वाद घालत बसा.. शाब्दिक प्रभुत्व दाखवा, किंवा वैचारिक
कोलांट्या मरा.. ह्या प्रवृत्तींचे राक्षस ह्या जगाला नवीन नाहीत.
तुमच्या ज्ञानेश्वरीत काय बुवांवर आणी त्यांच्या भंपक पणावर विश्वास ठेवा म्हणून सांगीतलय का? खरचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे जीवन जगला असता तर या अर्थेहीन गोष्टींवर विश्वास ठेवला नसता.
-- नाना