अगदी मान्य... हा प्रस्ताव ठेवल्याबद्दल धन्यवाद.
अजून एक गोष्ट सुचली, ते म्हणजे, आपापल्या लोकप्रतिनिधींना पत्रे पाठवणे (काहींनी कदाचित आधीच हे केले असेल). पत्रांचा काही उपयोग होणार नाही असे समजू नका. तुम्ही मतदार आहात, भारतात अजून लोकशाही आहे. फार तर १०-१२ रुपये वाया जातील. पण तुम्हाला काहीतरी केल्याचे समाधान मिळेल आणि तुमच्या प्रतिनिधींना तुमच्या मतांची जाणीव होईल.. ही पत्रे पाठवताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी..
पत्र सभ्य भाषेत लिहिलेले असावे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असावे. एका पानाहून जास्त नसावे. कोणत्याही राजकीय पक्षांचे स्वार्थ आणि मुसलमान धर्मावर टीका त्यात नसावी. पण तुमच्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या जबाबदारीची स्पष्ट जाणीव करून दिली जावी. लवकरात लवकर अतिरेकी भारतीय न्यायालयांसमोर आणले जावे ही अपेक्षा व्यक्त व्हावी. प्रतिनिधींवर या बाबतीत विश्वास ठेवण्याची इच्छा पण त्यात येणाऱ्या अडचणी व्यक्त व्हाव्यात.
तुमच्या प्रतिनिधींचे पत्ते पुढे दिल्याप्रमाणे..
लोकसभेतील प्रतिनिधी , तुमच्या जिल्ह्याचे प्रतिनिधी , मुंबईतील लोकप्रतिनिधी (हल्ली इंटरनेटमुळे हे फारच सोपे झाले आहे).
जर हा प्रस्ताव पटला तर लवकरात लवकर तुमच्या शहरांतील आजूबाजूच्या लोकांना गोळा करून अशी जास्तीत जास्त पत्रे पाठवावीत किंवा एकाच पत्रावर सह्या गोळा कराव्यात अशी विनंती.
सुहासिनी.