वरदा,

हो..काही कविता इथे परत होण्याचा संभव आहे .. बर्‍याच वेळा मी कविता दुसरी कडे कुठे लिहिल्या गेली आहे का हे पण शोधत नाही.. जे मी करायला पाहिजे खरेतर. आणि इथे माझ्याजवळ संदर्भासाठी कुठली पुस्तके नसल्यामुळे त्यात चुकाही भरपूर असाव्यात कदाचित..

श्री ना. धो. महानोरांची कविता:

झाडे झालिया हिरवीशी, शीळ घुमते रानात,

ओढ जांभळ्या मेघांची वाहे नदीच्या पाण्यात,

वाट झुंजूमुंजू होते, पीक मावेना शेतात,

लक्ष पाखरांचे थवे खेळ मांडती पाण्यात.

दुसरी एक कविता फार अर्धवट आठवते आहे:

तहान

सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान,

एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण,

व्हावे एवढे लहान (सारी मने कळो यावी ?)

....................(पाषाणाची फुले व्हावी)