कोणत्याही विरोधकाने माझ्या वारंवार विचारलेल्या प्रश्नाचे मुद्देसूद, व्यस्तीत ऊत्तर देणे टाळले आहे. जास्त कल टिंगल, टवाळी, चेष्टा, कुत्सित वाक्य,  मुद्द्याला सोडून बोलणे किंवा काहीतरी थातुर - मातुर लिहिणे इत्यादींत वेळ घालवला आहे.

तो प्रश्न होता .. (३री वेळ).

गुरूमहाराज हे ढोंगी आहेत, हे बऱ्याच जणांनी नुसत्या माझ्या एका अनुभव लेखनांवरून तर्काने जाणले!

तुम्ही कोणी त्यांना पाहिले नाही, ते कोण आहेत, कुठे आहेत, नाव - गाव काय.. काही माहिती नाही.

पण मला विरोध करताना असा आव आणला जातो, की तुम्हाला १००% माहिती आहे की ते ढोंगी आहेत!

कसली ही माहिती नसताना जे लोक खात्रीपूर्वक निर्णय घेतात, अंदाज काढतात त्यांच्या बुद्धीची किंवा करावी तेवढी थोडीच आहे.

काहीही माहिती नसताना जे लोक वाद घालू इच्छितात त्यांना वेळेचा सदउपयोग होण्याची बुद्दी होवो.

ह्या पुढे कोणत्या हि विरोधकाच्या अर्थहीन प्रश्नाचे मला उत्तर देऊन वेळ वाया घालवण्याची गरज वाट्त नाही.

सर्वांच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
- आपला नितीन.