एका अर्थी तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि सध्याच्या परिस्थितीवरूनही तसंच वाटतं.  त्यामुळे ढोबळमानानं म्हटलं तर पुढच्या दहा एक वर्षात महायुद्धाचं रणशिंग फुंकलं जाईल असं दिसतं.  पण माझा मुद्दा एवढाच होता की आंतरराष्ट्रीय व्यापाराचा दबाव पुढच्या काही काळात एवढा प्रचंड वाढत जाईल की त्यापुढे दहशतवाद, युद्ध वगैरे गोष्टी फिक्या पडत जातील.  एक साधं उदाहरण घ्या.  मुंबईत बाँबस्फोट झाले आणि दुसऱ्या दिवशी मुंबई परत आपल्या पायावर उभी राहिली कारण मुंबईकरांना पर्याय नव्हता.  इथला व्यापाराचा तो प्रचंड दबाव आहे. तसाच आंतरराष्ट्रीय स्तरावरचा व्यापाराचा दबावही प्रचंड प्रमाणात वाढतच जाईल आणि याला कारण म्हणजे सतत वाढता शैक्षणिक दर्जा,  शिक्षित लोकांची झपाट्यानं वाढणारी संख्या आणि कम्यूनिकेशन टेक्नॉलॉजीत अतिप्रचंड वेगानं होणारी प्रगती.  त्यामुळे माझा स्वतःचा हा अंदाज आहे की पारंपारिक महायुद्धाची शक्यता येणाऱ्या काळात धूसर होत जाईल. किंवा नुसतीच शक्यतेची परिस्थिती राहील पण खरोखरीचं युद्ध असं होणार नाही. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळे ते चूकही असू शकतं.  इतरांची मतं समजून घ्यायला आवडेल.