लादेनने अजून मान वर करून अमेरिकेकडे बघितलेले नाही त्यानंतर.

हे म्हणाल तर खरे आहे आणि म्हणाल तर तितकेसे खरे नाही.

९/११ नंतर अमेरिकेवर असे आणखी हल्ले झाले नाहीत हे खरेच, पण म्हणून 'लादेनने अजून मान वर करून अमेरिकेकडे बघितलेले नाही' असे म्हणणे सयुक्तिक ठरणार नाही.

एक तर ९/११ नंतर असा आणखी एखादा दणका देण्याची लादेनला गरजही उरलेली नाही. त्याचे उद्दिष्ट केव्हाच साध्य झाले आहे.

(* या शब्दयोजनेतून केवळ परिस्थिती इराकबरोबरच अमेरिकेसाठीही कशी वाईट आहे, एवढेच मांडण्याचा हेतू आहे.)

थोडक्यात, ९/११ नंतर लादेनने अमेरिकेवर आणखी हल्ले जरी घडवून आणले नसले, तरी ९/११ नंतर अमेरिकन समाजाच्या विचारपद्धतीत/जीवनमानात एक भला मोठा, नकारात्मक आणि ultimately अमेरिकेसाठी/अमेरिकेच्या संकल्पनेसाठी हानिकारक असा बदल घडून आला. या अर्थाने अमेरिका नष्ट जरी झाली नाही तरी अमेरिका अमेरिका राहिली नाही, यात लादेनची उद्दिष्टे साध्य झाली, असे म्हणता येईल. त्यामुळे - विशेषतः ९/११ नंतर एकंदरीतच वाढलेल्या सुरक्षायंत्रणेमुळे (दहशतवाद्यांसाठी) निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत - असे आणखी हल्ले घडवून आणून लादेनला काही साध्य करण्यासारखे आहे, असे वाटत नाही.

आणि मान वर करण्याबद्दल म्हणाल, तर अधूनमधून व्हिडियोटेपद्वारे संदेश पाठवून लादेन आपले डोके वर काढत असतोच की! आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुशसाहेबांना जेव्हा त्याचा राजकीय फायदा होऊ शकेल नेमक्या अशा वेळी तो टेपद्वारे डोके वर काढतो. बुशसाहेबांची political ratings कमी होत असली, की नेमकी अशा वेळी एखादी टेप येते. एकदा तर बुशसाहेबांच्या अध्यक्षीय पुनर्निवडणुकीच्या थोड्याच आधी अशी टेप आली होती, असे स्मरते. मला तर वाटते बुश आणि लादेन एकमेकांस पूरक आहेत - लादेन टेप पाठवून बुशसाहेबांची राजकीय परिस्थिती सुधारतो, आणि बुशसाहेब इराकमध्ये घुसून चिखल निर्माण करून लादेनसाठी/दहशतवाद्यांसाठी नवीन उमेदवारांचे एक आयते कुरण निर्माण करतात.

अर्थात हे 'एकमेकां साह्य करू' या भावनेने चालते असे म्हणण्याचा उद्देश नाही, पण Law of Unintended Consequences चा हा आणखी एक (कदाचित अधिक समर्पक) मासला म्हणता यावा.

(डिस्क्लेमर: वरील विवेचन हे माझ्या अल्पमतीप्रमाणे केलेले आहे. त्यात अनेक त्रुटी असू शकतील. केवळ माझे एक मत यापलीकडे त्याला अधिक महत्त्व नाही.)

पण आम्ही मात्र धडधडीत निषेधही करू शकत नाही कुठल्या देशाचे नाव घेऊन! त्यासाठी"सीमेपलीकडिल अतिरेक्यांच्या कारवाया" असा शब्दप्रयोग करावा लागतो.

सहमत. दुर्दैवाने हे खरे आहे. साधी गोष्ट घ्या. परवाच्या स्फोटांनतर पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी स्फोटांचा भारत-पाकिस्तानमधील unresolved issues(अर्थात कश्मीर, दुसरे काय?)शी संबंध जोडणारे एक विधान केले. या विधानास आपण आक्षेप घेतला खरा, पण दुर्दैवाने त्या आक्षेपाची तीव्रता मला तरी जाणवली नाही. या विधानाचा सरळसरळ अर्थ पाकिस्तानची या स्फोटात हात असल्याची / किमान स्फोट घडवणाऱ्या शक्तींना सरकारी पाठिंबा असल्याची अप्रत्यक्ष कबुली असा अर्थ आपण घेतला असता (निदान मी तरी असा अर्थ घेतला), तर त्यात काही चुकीचे ठरले नसते, आणि आपल्या सरकारी प्रवक्त्यास किमान अशा अर्थाचे विधान करण्यास काहीच हरकत नव्हती, असे मला तरी वाटले. संयम हा सद्गुण खराच, पण sometimes we turn patience/self-restraint into a fine art असे म्हणावेसे वाटते.

आमचं म्हणणं नाही की जाऊन पाकिस्तानावर हल्लाच करा पण जे करता येण्यासारखं आहे ते तरी करा- बांगलादेशी निर्वासितांना हाकला, अनाधिकृत झोपड्या बांधणाऱ्यांना हाकला, खोटे पासपोर्ट पुरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा...

सहमत. पण याचेही राजकारण होऊ शकते.

...आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किमान देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नांचे तरी राजकारण करू नका.

या आणि अशा गोष्टी अमेरिकनांना सांगाव्या लागल्या नाहीत.

हे सगळीकडेच होते. अमेरिका याला अपवाद आहे असे मला तरी वाटत नाही.

सुरक्षेचे राजकारण करून बुशसाहेब इराकमध्ये घुसलेच!

भारतीय राजकारण्यांना सांगूनही समजणार नाहीत.

कोणत्याच राजकारण्यांना समजत नाहीत. कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणे हा राजकारण्यांचा धंदाच असतो.

आमच्यासमोर एकच मार्ग उरतो हो मग टुकार का होईना कविता करून आपल्या रडगाणयाला वाट करून देणे.

असेच म्हणता येणार नाही. तूर्तास कदाचित. पण आपल्या मागण्या (म्हणजे सुरक्षेचे राजकारण न होता जे काही करता येण्यासारखे आहे ते केले जाणे) पूर्ण होईपर्यंत केवळ या मुद्द्यावर दरवेळेस (उडदामाजि काळे-गोरे असले तरी)राजकारणी बदलत राहणे हे कदाचित करून पाहता यावे. राजकारण्यांना मतांची भाषा कळते. अर्थात (विशेषतः मतपेढी राजकारण, गठ्ठामते वगैरे गोष्टी लक्षात घेता) याचा कितपत उपयोग होईल, हे सांगता येत नाही, पण प्रयत्न करण्यास काहीच हरकत नसावी. कोणास ठाऊक, कदाचित अशा मुद्द्यांमुळे जनतेत एकमत झाल्यास फरक पडेलही! आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा/काँग्रेसचा पाडाव जनतेच्या अशाच एकमतामुळे झाला होता. (अर्थात त्या निवडणुकीत सत्तेवर आलेल्यांनी नंतर काय दिवे लावले, हे सर्वज्ञात आहेच, पण ती गोष्ट वेगळी.)

अर्थात हे सर्व माझे दोन पैशाचे विचार...

- टग्या.