टगोजीराव, आपल्या नावातच अनेक गावचे पाणी प्यायल्याची छटा आहे. तशीच बिनधास्त आपली अभिव्यक्ती आहे. आपल्या बव्हंशी विचारांशी मी पूर्णतः सहमत आहे.
मात्र, सर्वसाधारण दहशतवादाचा प्रतिबंध, प्रतिकार आणि निःपात करण्याचा मार्ग निस्संशयपणे प्रेमाचा, सुसंवादाचा आणि सामंजस्याचा आहे.
मूलतत्त्ववाद्यांजवळ बहुधा अज्ञान, दारिद्र्य आणि गैरसमजुतींचा सुकाळ असतो. याव्यतिरिक्त जेव्हा त्यांचा इतर जगाशी संपर्कही तुटतो तेव्हा दहशतवाद निर्माण होतो. आपण सुसंवाद साधू शकलो तर ते जग तुटक न पडता त्यांना स्वतःतील तुटींची जाणीव आधी होईल. दुसऱ्यांच्या दुस्वासाची धग नंतर उमजेल.
हे कसे साधता येईल?