माझ्या ओळखीचे ठाण्यात एक महाराज आहेत. 'वा,छान,झकास' हा त्यांचा गुरुमंत्र आहे. ते कुणालाही कधीही वाईट म्हणत नाहीत.खाद्यपदार्थ आणि त्यातल्या त्यात लाडू व मिसळ यावर ते प्रवचन व निरूपण करतात.आणि हो, अधूनमधून ते शास्त्रीय संगीतावर सप्रात्यक्षिक व्याख्यानेही देतात. फक्त गतजन्मीचे पाप असेल तर त्यांची व्याख्याने त्या पापी माणसांना कळत नाहीत...
इतर कुणी त्यांची खोडी काढली तर ते हातात असेल ते ( चिरूट, चिलीम, पाईप, ग्लास वगैरे ) फेकून मारतात. पण मी त्यांचा निस्सीम भक्त असल्याने माझ्या लडीवाळ लीला ते हसतखेळत सहन करतात.