प्रिय चक्रपाणी,

खरेतर मला वाद पुढे न्यायचा नव्हता. पण तू पुन्हा चिथावणी दिलीसच.
तर, मी केवळ तुझ्या लेखनावर टिप्पणी केली होती. तू त्याचे स्पष्टीकरण मागितल्यावर ते दिले. त्यानंतरही 'हे'.!!

ही चिथावणीखोर कविता रचना म्हणूनही  टुकार आहे असे सरसकट विधान होणे तद्दन बेज़बाबदारपणाचे वाटते.
इथपर्यंत ठीक आहे. पण,
 प्रसंगी त्याची कीवही येते.
'हे' काय आहे? आवर. एकीकडे 'आदरणीय सर' दुसरीकडे 'हे'. बेरकीपणा म्हणावा की नाटकीपणा. हा सरबिरचा मेलोड्रामा आधी बंद करावा. फणश्यांनी किंवा प्रवाश्यांनी इथे काय म्हटले आहे ते सांगत बसू नये. ज्याला  आत्मविश्वास नसतो तो दुसऱ्यांच्या मतांची, प्रतिसादांची कुबडी घेतो.

टीका सहन होत नसेल तर कवीने आपल्या कवितांचे बाड रोज रात्री गालावर लावून झोपावे. कविता सार्वजनिक करू नयेत. असे माझे मत आहे.

वर्षानुवर्षे गोत्यावळ्याने, काका-काकूंनी, भावकीने हरबऱ्याच्या झाडावर चढवले किंवा बरे वाटावे किंवा चुचकारण्यासाठी म्हणा समर्थनार्थ दहा 'वा, वा, छान, छान' प्रतिसाद आले म्हणजे कृतार्थ होणारा तो 'बनचुका' कवीच.

त्याने आधी मनोगताबाहेर जाऊन थोरामोठ्यांना कविता दाखवाव्यात आणि आपली पायरी ओळखावी.

चित्तरंजन