प्रिय वचन म्हणजे समोरच्या माणसाच्या हिताचे, योग्य शब्दांत, पण प्रेमाने बोलणे. असे वाचल्याचे स्मरते.
तसेच बोलणे हे एक कर्म आहे त्यामुळे त्याची शुद्धता त्यामागे अधिष्ठित बुद्धीनेच (हेतूने) ठरते आणी होते.
मनांत एक आणि जिभेवर तेच असे त्याचे सामान्यपणे, पण योग्य, वर्णन आपण करू शकू.

परंतू व्यवहारामध्ये 'नरो वा कुंजरोवा' करावे लागते ते त्या ठिकाणी हितकारक असले तरी श्रेयस्कर नाहीच. (युधिष्ठिराचा रथ जमीनीला टेकला तो त्याच मुळे)

त्यामुळे बोलण्याचा हेतू हा अंतिमतः सर्वांच्या कल्याणाचा असेल तर ते बोलणे सत्य असे मला वाटते.

आत मी स्वतः असे करायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो. (असे करायचे आहे याची आठवण राहिली तरी ती प्रगतीच आहे. ही माझी कथा. :)
(प्रामाणिक) लिखाळ.