महेश, भोमेकाका, मिलींद, नितीन..

आपण या चर्चेला प्रतीसाद दिलात या बद्दल धन्यवाद..

मुळ चर्चा ही चमत्कार विषया वर नाही. माझ्या लिखाणातील दोषा मूळे असा गैरसमज झाला असल्यास क्षमस्व..

माझा मुद्दा त्यांच्या भक्तगाणांवर आहे. समाजातील लाखो माणसं एखाद्या महाराजांचे / स्वामींचे भक्त होतात, ते का होतात? त्याची सगळीच कारणं वैयक्तीक असतात की सामाजीक कारणं ही आहेत?

अभिजीत व प्रियाली यांच अस म्हणण आहे की या सर्व प्रकारांमागे असुरक्षिततेची भावना हेच मुख्य कारण आहे तसच बरेचसे भक्तगण हे कुणा इतरांमुळे "प्रेरित" होऊन यात सामिल झालेले असतात.

कारणांचा शोध घेण्यासाठी ही चर्चा आहे, कृपया ही चर्चा 'चमत्कारावर' नेऊ नये ही विनंती..

राहुल