टिळक-आगरकर वादाची शंभरी उलटून गेली. ते दोघेही इंद्राच्या दरबारी अमृतपान करीत आहेत, स्वर्गसुखात आहेत, आणि आपण मात्र अजून शिळ्या कढीला ऊत आणत बसलो आहोत. 'आता पुरे' असे कोणालाही म्हणावेसे वाटत नाही का? आपापल्या परीने दोघेही  मोठे होते, परंतु वेगवेगळ्या विचारसरणींनी आज त्या दोघांच्या नावांना आपल्या दावणीला बांधून जो हैदोस घालण्याचा सपाटा लावला आहे तो निव्वळ हास्यास्पद आहे.'टिळकवादी' , 'आगरकरवादी' हे शब्द एकमेकांवर शिव्यांसारखे वापरले जात आहेत.पुष्ट्यर्थ  ह्या संकेतस्थळावर ह्याच विषयावर अन्यत्र सुरू असलेला वाद आणि स्वनामधन्य विद्वानांनी तोडलेले तारे वाचावे. अहो, आता बस झालं, सव्वाशे वर्षांपूर्वी टिळक चुकले की आगरकर हा विषय आता चावून चावून चोथा झालाय. त्यातून काहीही निष्कर्ष निघणार नाही, केवळ चर्चेचा वाद आणि वादाचे भांडण होईल! ( हे बाकी मनोगतावर नेहमीचेच ).