सर्वांनी (कागदी वाघ, भाऊ असे शब्दांच्या मोठ्या याद्या देणारे आणि इतर कुशाग्र, चित्त, मिलिंद, एकलव्य, अवधूत, मीराताई, मृदुलाताई, नंदन, वरुण, लिखाळ, तात्या, टग्या, विचक्षण, शैलेश, वेदश्री, भाष, व चुकून नाव राहिलेले मित्र) खूप उत्साहाने चर्चेत भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.
आपण स्वतःचे दोष नेहमीच काढत असतो, किंबहुना आपण त्यातले तज्ज्ञ/उस्ताद/व्यसनी वगैरे सगळे आहोत. यावेळी मला असे वाटले की एखाद्या सकारात्मक पैलूवर लक्ष केंद्रित करून पहावे. आपली शक्तिस्थाने न्याहाळून त्यांच्या बाजूबाजूने, आधाराने जाऊनही प्रगती करणे शक्य असते.
असे अनेक यशस्वी शब्द पाहून, मराठीचा अगदीच लय होऊ लागला आहे असा आपल्या मनात जो गंड असतो त्याचे काही प्रमाणात तरी निराकरण व्हावे व आपल्या भाषेच्या विकासासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्याची ऊर्मी सर्वांच्या मनात प्रबळ व्हावी हीच इच्छा.
(भाषाप्रेमी)
दिगम्भा