मलाही काही जुन्या म्हणी वाक्प्रचार माहिती आहेत.  अर्थात प्रत्येकाची व्युत्पत्ती आणि बरोबर पणाबद्दल मला पूर्ण माहिती आहेच असं नाही.  जाणकारांनी या बाबतीत मदत करावी.  अशीच काही उदाहरणं आणि त्यांचे अर्थ खालील प्रमाणे -

  1. शेवटची आपोष्णी घेणे - मृत्यू
  2. ऊस गोड पण मुळ्या सोड म्हणण्याची वेळ येणे - अधाशीपणा करणे
  3. असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा - अदूरदृष्टी
  4. द्राक्ष संस्कृती विरुद्ध रुद्राक्ष संस्कृती - सध्याचे मनोगतावरचे गरमागरम विषय!
  5. इतोपि धर्माः ततोपिभ्रष्टः (चू.भू. दे. घे.) - अधर्म करणे
  6. प्रेमाचा विसार / प्रेमाची चौथाई देशमुखी - चुंबन
  7. सुखं च मे शयनं च मे - चैन करणे

यांत काही चूक असल्यास क्षमा करा, पण सुधारणा समजून घ्यायला आवडेल. अजून असेच काही वाक्प्रचार आठवल्यास परत एक प्रतिसाद टाकीन. 

- मिलिंद