केला होता मी अट्टहास? असा शिवाजी महाराजांना आणि जिजाबाईंना प्रश्न पडला असेल...

कदाचित नंतर याला विस्तृत  उत्तर देईन, पण काही प्रश्न विचारतो ज्याची उत्तरे चर्चा सुरू करणाऱ्या कडून अपेक्षित आहेत. न पेक्षा जरा भांग घेतली की चार ओळी लिहिता येतात या पेक्षा याला महत्त्व राहाणार नाही...

  1. शिवाजी महाराजांचा धर्म कोणता होता - त्यांनी पाळलेला आणि तुम्ही समजलेला?
  2. शिवाजी महाराजांनी भोसले राज्य स्थापावयाच्या ऐवजी हिंदवी स्वराज्य का स्थापले?
  3. हिंदू धर्म न सोडता आणि त्यामुळे हालहाल होउन मरण पत्करणाऱ्या संभाजी महाराजांबद्द्ल आपले काय मत राहील?
  4. लेखात म्हंटल्याप्रमाणे या नविन धर्मात "ब्राम्हणांना" येवून देणार नाहीत. बाकीच्या कोणी (परधर्मियांनी) येयचे ठरवले तर तुमचे मत काय?
  5. तुमची वेषभुषा काय असणार? - कुंकू लावणार का तेही निषिद्ध?
  6. तुमची भाषा कोणची? - कारण मराठी भाषेच्या आद्यप्रेरणेत चक्रधरस्वामी आणि ज्ञानेश्वरमहाराज आहेत म्हणून विचारलेले बरे?
  7. आंबेडकरांचा उल्लेख असल्यामुळे  - आंबेडकरांना न समजणाऱ्यांना वाटते की त्यांनी हिंदू धर्माचा द्वेष केला - ते खरे नाही.. त्यांनी घटना सुधारताना (आणि स्वतः बौद्ध धर्म स्विकारायच्या आधी) मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, ज्यू सोडल्यास सर्वांना कायद्यापुरते का होईना हिंदूच समजले...
  8. बाकीचे सर्व समजू शकतात पण आपण नरकासूर आणि हिरण्यकश्यपूला" गाडगेमहाराज आणि आंबेडकरांच्या रांगेत कसे बसवले? का दुसऱ्याच्या बायका पळवणे हा गूण धरला जाणार?
  9. आपले स्थान इतर राज्यात काय असणार? का आपण भारत हा देश मानतच नाही? फक्त महाराष्ट्र?
  10. तुमची शिवधर्म. कॉम बंद का पडली?

शेवटचा प्रश्नः तुमचा आत्ताचा धर्म काय आहे? जो आपण वैयक्तिक आयुष्यात पाळत असाल? आपल्या नावात गणेश कसे आले? वास्तवीक "शिवश्री"तही "शिव" आहेच..

ज्ञानेश्वरीतील रूपक तुमच्या सारख्या विचार करणाऱ्या कोणालाही (सर्व जात धर्म वगैरे) लागू होतेः (भावार्थ - जसा आठवला तसा)

"बाहेरून भुंगा उडत येवून कमळाच्या सुंदर फुलांवर बसतो, त्यात जावून सुगंध घेतो, त्यातील मधाचा आस्वाद घेतो...पण त्याच कमळाच्या डोहात बसलेला बेडूक मात्र ह्या सगळ्या आनंदाला मुकून नुसताच डराव डराव करत चिखलात राहातो...."

नाम्या