परदेशी साहेब,

जर तुम्ही राजीखुशीने-कोणतीहि जबरदस्ती नसताना करार "लिहून" दिला असेल तर त्यातून पळ का काढीत आहात?  त्या करारातून मुक्त व्हायचे असेल तर ते गोडीगुलाबीने होऊनच चांगले.  वकिलाकडून कारवाई झाल्यास तुम्हाला मनःस्ताप, वेळकाढूपणा आणि आर्थिक नुकसानच सहन करावे लागेल.

तसेच अशाप्रकारे करार तोडणाऱ्या व्यक्तीला इतर कोण नोकरी वा जबाबदारीची जागा देईल?

आपण जो निर्णय घ्याल तो सर्व सारासार विचार करून घ्यावा असा कळकळीचा सल्ला आहे.

एकंदर प्रत्येक स्थितीमध्ये फक्त स्वतःचा फायदा कसा होईल हे बघण्याची भारतीय वृत्ती आपल्या प्रस्तावात दिसली त्यामुळे वाईट वाटले.

कळावे,
परभारतीय