मला वाटत की परदेशींना मदतीची अपेक्षा आहे याचा अर्थ अडचण आहे. नाहीतर असा विषय चर्चेला घेण्याची गरज काय? थोडक्यात आपण शक्य ती मदत करायला हवी. पुढचा मुद्दा असा आहे की करार करून घेऊन कंपन्या त्याचा गैर वापर करून कामगारांची पिळवणूक करतात हे सत्य आहे. गरजवंताला अक्कल नसते म्हणा वा अडला हरी गाढवाचे पाय धरी असे म्हणतात. भारताच्या लोक संख्येत अभियंत्याची संख्या, त्यात नोकऱ्यांची संख्या आणि त्यात त्या नोकऱ्यांसाठी जीवघेणी स्पर्धा. यात सरळ साधा माणूस नेहमीच भरडला जातो. अगतिक असतो आणि कंपन्या याचा पुरेपूर फायदा घेतात हा स्वानुभव आहे.

परभारतीयांनी सल्ला देताना करार राजीखुशीने केला आहे हे गृहीत धरले आहे हे थोडे खटकते. असे असते तर मदत मागितली असती का?
"एकंदर प्रत्येक स्थितीमध्ये फक्त स्वतःचा फायदा कसा होईल हे बघण्याची भारतीय वृत्ती आपल्या प्रस्तावात दिसली त्यामुळे वाईट वाटले." हे पूर्णतः खोडसाळ आणि भारता बाहेर राहून भारतीयांना नावे ठेवण्याचे वक्तव्य आहे. मला वाटत परभारतीयांमध्ये ही फॅशन रूढ झाली आहे. (आपल्या नावा वरून आपण भारतात राहता नाही हे गृहीत धरले आहे हे आवर्जून नमूद करतो). भारता बाहेर राहायचे, भारतीयांना नावे ठेवायची पण स्वतः भारतीय चाली रिती, प्रथा आणि आचार विचार पूर्णपणे सोडून द्यायचे नाहीत. अनेक परभारतीय हे न चुकता करतात आणि तितकेच न चुकता आठवडा अंताला भारतीय दुकानात जाऊन भाजीपाला अन मसाले आणतात. असे किती भारतीय आहेत ज्यांना अभारतीयांना पूर्णपणे सामावून घेतले आहे?

काही मते परखड आहेत. पण एक भारतीय म्हणून तो आरोप मला सुद्धा लागू होतो जो चुकीचा आहे.

चाणक्य