आपल्याकडे ध्वज आचारसंहितेचे अती खूळ माजवले जाते. पूर्वी भटांनी सोवळ्याचा अतिरेक करुन त्या प्रकाराला हास्यास्पद केले होते त्याची आठवण येते. देशाच्या नागरिकाला हवा तेव्हा भारताचा झेंडा फडकवता आला पाहिजे.  योग्य तो मान राखून शर्ट, बॅग वगैरेवर ते चिन्ह लावले तर आकाश कोसळल्यासारखा गहजब होता कामा नये.
 अमेरिकेत हे स्वातंत्र्य आहेच शिवाय निषेध म्हणून अमेरिकन ध्वज जाळायलाही घटना मुभा देते. अगदी इतके नसले तरी आपण आपली आचारसंहिता थोडी शिथिल करायला हवी. 

 १५ ऑगस्ट नंतर फेरीवल्याकडून घेतलेले झेंडे दुसऱ्या दिवशी कचऱ्यात जातात हे मी इतके मनाला लावून घेऊ इच्छित नाही. १५ ऑगस्टला सामान्य माणूस ते कौतुकाने/आदराने मिरवतो हे मला जास्त महत्त्वाचे वाटते.