आपल्याकडे ध्वज आचारसंहितेचे अती खूळ माजवले जाते.

देशाच्या नागरिकाला हवा तेव्हा भारताचा झेंडा फडकवता आला पाहिजे. योग्य तो मान राखून शर्ट, बॅग वगैरेवर ते चिन्ह लावले तर आकाश कोसळल्यासारखा गहजब होता कामा नये.

आपण आपली आचारसंहिता थोडी शिथिल करायला हवी.

सहमत.

मध्यप्रदेशातल्या (परदेशातून (बहुदा अमेरिका) परतलेल्या) एका उद्योजकाने त्याच्या काराखान्यासमोर भारतीय ध्वज लावायला सुरुवात केली. ध्वज आचारसंहिता तो इमाने इतबारे पाळत असे. स्थानिक कायदासुव्यवस्था (पोलीस वगैरे) संस्थाकडून त्यावर बराच दबाव आला. त्यातून खटला चालू झाला. तो खटला (म्हणे) सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. त्याचे पुढे काय झाले माहीत नाही.