साती,

आपल्या लेखनशैलीबद्दल कौतुक आहे. पण सदर लेखनाच्या विषयाची निवड चुकीची आहे असे सखेद निदर्शनास आणून द्यावेसे वाटते.

प्रिन्सचा अपघात हा त्याच्या वाढदिवशीच झाला हा योगायोग. पण आपल्या लेखातून तोही बनाव असावा असे सूचित होते.

राजाने एक हलकासा धक्का देऊन खड्ड्यात ढकलून दिलं आणि मी बसले पडत 'ऍलिस इन वंडरलँड' मधल्या ऍलिससारखी,

"राजाचं प्लॅनिंग असंच व्यवस्थित हो नेहमी" मी मनात म्हणाले.

ह्या वाक्यांतून काय ध्वनित होते?

राजकारण्यांचा सदर घटनेतील सहभाग हा चर्चेचा विषय नव्हताच तेंव्हा. वाहिनीवर पाहिली जात होती ती मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सहृदयता. ती विडंबनाचा विषय होऊ शकत नाही असे प्रामाणिकपणे वाटते.