त्याची धावसंख्येची सरासरी कुठल्याही कालखंडात हि चांगलीच आहे. आणि तो चांगला खेळतो म्हणूनच हे सर्व चालू आहे. ज्यांनी २५००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत त्यांनी त्याच्याविषयी बोलावे. ते योग्य होईल. आपण किंवा मांजरेकर सारखे अनेक यांनी काय बोलावे.

आपण तर २५००० धावा पळून सुद्धा काढल्या नाहियेत. ६ तास सलग फलंदाजीपण केली नाहिये. पण सोय आहे म्हणून सचिनने काय करायला पाहिजे ह्यावर रकाने भर भरून लिहिणार हे योग्य नव्हे. मुंबईला सचिनची हुर्यो उडवली, काय मिळाले ?

महत्वाचे म्हणजे आपण काय योग्य ते ठरवण्यासाठी आपण पात्र आहोत का हा शेवटी प्रत्येकाने विचार केला पाहिजे.