सुंदर कल्पनाविलास.
चुकून खड्यात पडलेल्या प्रिन्स बद्दल सहानुभूती जरूर आहे. पण 'आजतक' 'NDTV' वगैरे वाहिन्यांनी स्वार्थासाठीच त्याचा उपयोग केला. ही अतिशय हीन प्रवृत्ती आहे. श्री. रामदास फुटाण्यांनी त्यावर केलेले काव्य हेच अधोरेखित करते की महाराष्ट्रात कुपोषणाने (माळशेज?) प्राण गमावलेल्या बालकांचे बलिदान दुर्लक्षितच राहिले.
सर्वश्री विसोबा खेचर, सन्जोप राव आणि नामी-विलास ह्यांच्या मतांशी मी सहमत नाही. सदर लेखाचा उद्देश, बेजबाबदार वृत्त वाहिन्यांची व्यापारी वृत्ती उघड करणे हाच आहे. मूळ घटनेचे गांभीर्य पातळ करण्याचा उद्देश कुठेच दिसून आला नाही.
'विनोद, हे समाजातील दोष हसत-खेळत दाखवून देण्याचे एक प्रभावी शस्त्र आहे.'