. ज्यांनी २५००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत त्यांनी त्याच्याविषयी बोलावे. ते योग्य होईल. आपण किंवा मांजरेकर सारखे अनेक यांनी काय बोलावे.

 हे तुमचे काहीतरीच, मिलिंद. ह्या न्यायाने फलंदाजी ह्या विषयावर केवळ ब्रॅडमननेच बोलावे (तेही गेले, तेव्हा आता कोणीच बोलू नये!),   गोलंदाजीवर फक्त वॉर्ननेच बोलावे, साहित्यावर काही बोलण्याचा अधिकार केवळ व्यास, शेक्स्पिअर,वा कालिदास ह्यांनाच आहे ,इत्यादी, इत्यादी! मांजरेकरचे म्हणणे चूक की बरोबर हा स्वतंत्र विषय झाला, पण त्याने,किंबहुना कोणीही, सचिनवर लिहू-बोलूच नये हा आग्रह व्यक्तिस्वातंत्र्याची व अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणारा ठरेल. आपल्याकडे 'फ्रीडम ऑफ स्पीच'चे एव्हढे वावडे का आहे लोकांना काही कळत नाही - बहुधा व्यक्तिपूजेच्या अतिरेकामुळे असे घडत असावे.