मला जी माहिती आहे त्याप्रमाणे, संन्याशाची मुलं म्हणून ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा विसोबांनी अतिशय छळ केला.  एकदा मुक्ताईला मांडे खावेसे वाटले, पण त्यांना विस्तव आणि खापर मिळू नये म्हणून विसोबांनी जीवाची शिकस्त केली.  हिरमुसलेली मुक्ताई जेव्हा रडायला लागली तेव्हा ज्ञानदेवांनी योगसामर्थ्याने आपली पाठ गरम केली आणि मुक्ताईने त्यांच्या पाठीवर मांडे भाजले.  आता विस्तव नाही आणि खापर पण नाही.....मग ही मुलं कशी मांडे करतील म्हणून विसोबा लपून बघत असतो.  ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाजलेले मांडे बरोबर भाजल्या गेलेत की नाही हे बघायला विसोबा ओणवे होऊन सरकत मांड्यांजवळ आले तेव्हा ज्ञानेश्वर त्यांना म्हणाले,"सरपट ना खेचरा!" ज्ञानेशवरांचे ते अचाट योगसामर्थ्य बघून विसोबा त्यांचे भक्त झालेत.