सचिनने शतकं किती ठोकली ह्यापेक्षा अमक्या अमक्या सामन्यात त्याने मॅग्राथ ची कशी जिरवली, शेन वॉर्न ला कसे दिवसा तारे दाखवले, ओलोंगाला त्याची जागा कशी दाखवली ह्या आठवणी जास्त महत्वाच्या आहेत.
सहमत.
सचिनची ९०/४५ धावांवर पोहोचला की सुरू होणारी धडपड केविलवाणी वाटते. सांघिक कामगिरी पेक्षा वैयक्तिक कामगिरीला महत्त्व देण्यास इथूनच सुरुवात होते. सामना हरला काय किंवा जिंकला काय..माझ्या नावावर अजून एक शतक लागलं..
सचिन या भावनेने कधीच खेळला नाही असे वाटते. अशा प्रकारे सचिन खेळला असता तर तो जितक्या खेळ्यांत ३५-४० आणि ६५-९० च्या दरम्यान बाद झाला तितक्या सर्व खेळ्या तो टुकूटुकू खेळून स्वतःच्या नावावर अनेक अर्ध/शतके जोडू शकला असता. पण तसे न करता त्याने आक्रमतेने खेळ करणे सोडले नाही असे वाटते. सचिन अशा भावनेने खेळता तर त्याच्या अर्धशतकांची आणि शतकांची संख्या आज आहे त्याच्या (अंदाजे) दुप्पट झाली असती असे वाटते. (या तक्त्यातला धावांचा स्तंभ पाहावा.)
(अशा प्रकारे खेळण्यात नुकताच संघाबाहेर फेकला गेलेला बंगाली कप्तान मातब्बर होता असे आमचे निरीक्षण आहे. सदर खेळाडूने आपले अर्ध/शतक राखण्याच्या हेतूने रंगात आलेल्या दुसऱ्या खेळाडून धावचीत होण्यास बळी पाडल्याचेही चांगले लक्षात आहे.)
वयपरत्त्वे सगळ्यांच्याच वागण्यात फरक पडतो असे वाटते. १६ वर्षे वयाच्या सचिनची आक्रमकता ३३ वर्षाच्या सचिनमध्ये कशी असेल?
तसेच मागे कोणीतरी 'मनोगत'वर म्हणाले होते. ९०/४५ धावा संघासाठी काढल्यावर १०/५ धावा त्याने स्वतःसाठी काढल्या (जे तो करत नाहीच, तरीही) तर बिघडले कुठे?