मला असे वाटते की 'शरीर कविता, नजर रुबाई, पदर पदर, उलगडुन जावे' ह्या मधे 'एखादा प्रणय-प्रसंग' अपेक्षीत असावा. तन आणि मनाच्या धुंद, तरलतम अवस्थेमुळे, शरीर 'कविता' म्हणजे शरीराची बोली- देहबोली, कवितेसारखीच बोलकी,खुप काही सांगणारी झाली आहे, तसेच नजर सुद्धा खुप बोलकी, अनेक प्रणयरम्य भाव-भावनांचे प्रतिबिंब असलेली, एखाद्या रुबाईसारखी . आणि त्यातील भावार्थ म्हणजे, प्रेयसीला जे प्रियकराला सांगायचे आहे, ते सर्व सर्व आपसूकच उलगडुन जावे,..कदाचित शब्दाविनाच!
तसेच 'जिवंत होण्या...'मधे- असे अपेक्षीत असावे की, तुझ्या मिठीत मला जे चैतन्य मिळते, जीवन मिळते, ते फक्त एकदाच अनुभवण्यासाठी मी अनेक मृत्युंशी सामना करण्यास तयार आहे, किंवा अनेक जन्म घेण्यास तयार आहे, किंवा त्यावर अनेक जन्म कुर्बान आहेत असाही होऊ शकतो. चु.भु.द्या.घ्या.
-मानस६