जयन्तराव,
सर्वप्रथम प्रतिसादाबद्दल आभार. मला वाटते एकदा पहिल्या ओळीत 'अजाण देही' म्हटले की पहिला अनुभव, नव्हाळी हे त्यात आपोआप सूचित होते. पुन्हा दुसऱ्या ओळीत 'मी' ची गरज नाही. 'अजाणता' मध्ये 'मी' अध्याहृत आहेच, नाही का? खरं तर ही 'अजाण' द्विरुक्ती टाळण्यासाठीच मी प्रथम सुचलेली 'अजाण देही वसंत यावा' ही ओळ रद्द करून 'वसंत यावा उधाण देही' ही ओळ वापरली होती.