हे एकदम विचार करायला लावणारे आहे. मीही माझे मत मांडू ईच्छितो.
मी खालील गोष्टी करतो.
ज्यांना मराठी समजतं त्यांच्याशी मराठीतच बोलतो.
मराठी वर्तमानपत्रच घेतो आणि वाचतो.
मराठी नाटके आणि चित्रपट पाहातो. (चांगले असल्यास)
अशूद्ध भाषेतील सरकारी जाहिराती पाहून संतापतो.
माय मऱ्हाठीतच शिव्या घालतो. ;)
पण या सगळ्याचा बाऊ का करतात काही लोक?
सगळे जग एक "ग्लोबल व्हिलेज" होत आहे.
माझ्यामते पूर्वीही मराठी भाषेमधे हिंदी अथवा फारसी भषेचा प्रभाव होताच ना?
कोणतीही भाषा परिपूर्ण कधिच नसते, आणि ईतर भाषांचा तिच्यावर परिणाम होतच असतो. कोणा लेखकाने किंवा ईतिहासकाराने अशी चिंता पूर्वी व्यक्त केल्याचे ऐकिवात नाही "पू ल" ना ही लोक PL असे संबोधित करायचे.
हा न्यूनगंड बाळगून, की मराठी जगवण्यासाठी तिचा प्रसार करणे गरजेचे आहे हे चूकीचे आहे. उलट मराठी सुद्रूढ करण्यासाठी तिचा वापर करणे गरजेचे आहे पण त्यासाठी आम्ही इंग्रजी थोडेफार वापरले तर बिघडले कुठे?