म्हणे एकदा रफ़ीसाहेब आणि लताबाई एका द्वंद्वगीताचं ध्वनिमुद्रण करत होते. रफ़ीसाहेबांचा अंतरा गाऊन झाल्यावर लताबाईंची 'एंट्री' होती. लताबाई गायला लागल्या आणि गाणे संपल्या संपल्या रफ़ीसाहेब लहान मुलासारखे रडायला लागले. म्हणाले, 'मैं ऐसे क्यूं नहीं गा सकता?"
गाणं होतं 'पारसमणी' मधलं "वो जब याद आए बहोत याद आए."
रफ़ी फ़ार भावुक माणूस असणार. त्याशिवाय 'अभी न जाओ छोडकर', 'दीवाना हुआ बादल', 'ऐ गुलबदन', 'एहसान तेरा होगा मुझपर' सारखी गाणी झालीच नसती !