कायदा केला खरा, पण करणाऱ्यांपैकी कुणाच्या मुलबाळाना काम करावे लागत नसल्याने त्यांनी फारसा विचार केलेला नाही.
मुलाना कामाला बंदी तर दरिद्री मुले काय करतील? उपाशी मरतील की भीक मागतील की चोऱ्या करतील? मुलाना काम करताना पाहून खूप वाईट वाटते. पण रस्त्यात भीक मागणाऱ्या मुलाना पाहून त्याहून वाईट वाटते. आज या देशात असंख्य लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. जे स्वतःचे पोट भरू शकत नाहीत, ते मुलाना काय देणार? ज्याला एक मुल पोसाची ऐपत नाही ते चार मुलाना जन्म देतात. हे सरकारला माहित आहे तरीही सक्तिचे कुटुंबनियोजन का केले नाही?
कुठलीही सुधारणा टप्प्याट्प्प्याने करावी लागते ती एकदम करून चालणार नाही. एकदम बाल कामगार बंदी करण्यापेक्षा प्रथम त्यांना दिलेले कामाचे स्वरुप, कामाचे तास, वर्तणूक यावर कायदा करून तो अंमलात आणायला हवा. मग मुलांचे काम बंद केले तर ती शिक्षण घेतीलच अशी व्यवस्था केली पाहिजे. शिवाय सर्व गरीब मुलाना विनामूल्य शिक्षण दिले गेले पाहीजे, मुळात मुलांची जन्मसंख्या नियंत्रीत केली पाहिजे.
हे काहीही न करता मुलाना काम करण्यास बंदी केली तर त्या मुलाना वरील तीन पैकी एक पर्याय स्विकारावाच लागेल - भीक-चोरी-उपाशी मरण.