नेमकं,थेट आणि काळजाला हात घालणारं प्रकटन.
पाची बोटांना जोडणारा पंजा निखळला असं वाटतं...

माणसामाणसांमधील नाती सुध्दा, काही लाभतात, काही नाही लाभत. जिथं ओलावा मिळेल, तिथली मुळं आपोआप घट्ट होतात. तिथल्या पायांना आपोआप नमस्कार घडतो. आणि एक दिवस अचानक जाणवतं- आज पाठीवर आशीर्वादाचा कापरा हातच नाही. धागे तुटत चालल्याची जाणीव काळीज भेदून जाते.

आक्का गेल्याचं खरं दुःख हे आहे. हा शोक एका व्यक्तीसाठी नाही, एका वृत्तीसाठी आहे. आक्कासारखं सुपाएवढं काळीज घडवायचं म्हणून घडवता येत नाही. शिक्षण, संस्कार, अनुभव... कशाकशानं ते मिळत नाही. येतानाच कुणी ते घेऊन येतो, आणि जाताना घेऊन जातो.

कालचक्राचं एक वर्तुळ पूर्ण झालं.

या ओळी वाचून अंतर्मुख झाल्यासारखं वाटलं.
--अदिती