विशेष आवडलेले, इतकेच नव्हे तर पटलेले :

हा शोक एका व्यक्तीसाठी नाही, एका वृत्तीसाठी आहे. आक्कासारखं सुपाएवढं काळीज घडवायचं म्हणून घडवता येत नाही. शिक्षण, संस्कार, अनुभव... कशाकशानं ते मिळत नाही. येतानाच कुणी ते घेऊन येतो, आणि जाताना घेऊन जातो.

आजी- आजोबांनंतरही नाती रहातात, नाही असं नाही, पण सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा धागा निसटलासं वाटतं. पाची बोटांना जोडणारा पंजा निखळला असं वाटतं.

आणि एक दिवस अचानक जाणवतं- आज पाठीवर आशीर्वादाचा कापरा हातच नाही. धागे तुटत चालल्याची जाणीव काळीज भेदून जाते.