सुरेख लिहिले आहे. लेखन मनाला भिडले.

एकच वाक्य खटकले-

 त्यातूनच देवधर्म, पैपाहुणे, शेतावरचे वाटेकरी आणि आपल्या प्रज्ञावंत पण कलंदर नवऱ्याचा संसार सांभाळत राहिली.

नवऱ्याचा संसार का बरं? तो तुमच्या अक्कांचाही संसार नव्हता का? असू नये का? एखाद्या बाईने तमक्याचा संसार केला, त्याच्या मुलाबाळांचे पालनपोषण केले असे म्हणण्याची पद्धत आहे ती मला चुकीची वाटते. संसार करूनही, खस्ता खाऊनही त्यापासून स्त्रियांना अलिप्त का ठेवायचे? केवळ त्या आर्थिक हातभार लावत नव्हत्या म्हणून?