मराठीची जोपासना ही घराघरातून होते, सभासंमेलनाने नव्हे.
भोमेकाका,
आपण वरील वाक्याला का सहमत नाही ते कळले नाही. सभासंमेलने भरवू नयेत असे मी कुठेहि म्हटले नाही. तसेच हा विषय मुख्यत्वे प्रचंड पैसे खर्च करून जी साहित्य सम्मेलने भरवतात त्यांच्या रोखाने आहे. अशा संमेलनाच्या खर्चाची जबाबदारी मराठी माणसाने घेणे हे त्याचे कर्तव्य आहे असा एकंदर सूर आहे त्याला माझा तीव्र विरोध आहे.
साहित्यिकांनी ती संमेलने जरूर भरवावीत. साहित्यात रस असणाऱ्यांनी पण अशा संमेलनात भाग घेऊन त्याचा अस्वाद घ्यावा. त्यावर वैयक्तिक आणि शासन पातळीवरून योग्य रितीने (पाहिजे तर भपकेदार) खर्च करावा. पण त्यामुळे मराठीची जोपासना होत नाही हे माझे ठाम मत आहे.
तुम्ही अभियंते, शास्त्रज्ञ यांच्या संमेलनाने त्यांचा फायदा होतो असे म्हणालाच आहात. तोच तर माझा मुद्दा आहे. सामान्य शास्त्राच्या विद्यार्थ्याला किंवा शास्त्राबद्दल रस आणि आपुलकी बाळगणाऱ्या स्थराला त्या कॉन्फरन्सेसचा फायदा होतो का? अशी संमेलने भरविण्याचा खर्च पेलण्याचे सामन्य लोकांचे कर्तव्य आहे का? माझे म्हणणे अजिबात नाही.
शास्त्राची माहिती, गोडी ही शाळेतले शिक्षक, पालक, आणि मुलांचे वाचन अशामुळे जोपासली जाते. शास्त्रज्ञ, अभियंते यांच्या कॉन्फरन्सेस मुळे नव्हे. (तीच गोष्ट संगिताची)
बघा पटते का माझे म्हणणे.
कलोअ,
सुभाष