खरं आहे अगदी. अहो या नसत्या उपदेशांनी वात आणतात यार. एकतर 'विवेक' किंवा 'सनातन प्रभात' म्हणजे आपण जगाचे तारणहार आहोत हे समजणारी जमात. सारं आयुष्य आपल्या गावाबाहेर न जाता, वर 'विवेक' वा 'सनातन प्रभात' शिवाय काहीही न वाचता 'चार पावसाळे जास्त पहिलेत' चा दावा. वैताग असतो यार.  अशाच एका विद्वानांना 'चार पावसाळे पहिलेत हो, पण अनुभवलेत का?' असे विचारून सॉलिड भडकावले होते. सुदैवाने तेवढे पुरले आणि भविष्यातील त्रास वाचला.

-विचक्षण