वपुंची एक छान कथा आहे. नाव विसरलो.

पण आयुष्यभर असे आयुष्य जगलेला आणि निवृत्तीनंतर 'आयुष्यभर केले नाही ते सर्व करून बघू' म्हणणारा एक माणूस. आपल्या आयुष्याचे सार्थक असेच तुलनत्मक आणि नकारात्मक तर्काने सिद्ध करतो.  तो सांगतो की त्याच्या मुलाला (कोणा) गोखलेंच्या मुलासारखा पोलिओ झाला नाही कारण त्याने लग्न केले नाही. त्याने लग्न केले नाही त्यामुळे कोणा सावंत (चू.भू. द्या घ्या) सारखी त्याची बायको पळून जाण्याचा प्रश्न नाही. असे अनेक इतरांच्या समस्यांचे वर्णन आणि त्या मला नाहीत म्हणून मी सुखी, माझ्या आयुष्याचे सार्थक झाले असा युक्तिवाद. या माणसाला काय म्हणावे मला कळले नाही. त्याचा आधी राग आला आणि मग असे वाटले की जर याहून अधिक काही करण्याची त्याची कुवत नसेल तर त्याने ज्यात समाधान मानले आहे ते कदाचित त्याच्या आयुष्याला पुरेसे असेल. तर 'विवेक' वा 'सनातन प्रभात' चे वाचक (फक्त प्रातिनिधिक अर्थाने घ्या) असेच असतील तर त्यांचे अज्ञानाचे सुख तरी का हिरावून घ्यावे.

कथेचे नाव व पुस्तकाचे नांव लवकरच देतो.

-विचक्षण