हात तुझा हातातुन, धुंद ही हवा
रोजचाच चंद्र आज भासतो नवा
अरुण दाते व सुधा मल्होत्रा (की कृष्णा कल्ले?)
         मंगेश पाडगावकर
                    श्रीनिवास खळे

शुक्रतारा नंतर खळ्यांनी अशीच कितीतरी सुंदर द्वंद्वगीते दिली (आणखी एक उदा. श्रीरंग सावळा तू, मी गौरकाय राधा) आणि त्यातली बहुतेक लोकप्रिय झाली. शेवटची आठवतात ती अरुण दाते व आशा यांची, "ऊन-सावली" या संग्रहातली.
समान घटक अर्थात अरुण दाते आणि मंगुअण्णा.