संजोपराव,
आता भेळेचे पैसे 'विवेक' आणि 'सनातन प्रभात' च्या रद्दीतून असं काहीतरी..
या विधानाला माझा तीव्र आक्षेप आहे!
एका विशिष्ट विचारसरणीला मानणारी,एका विशिष्ट नगरात राहणारी व स्कॉच+मटण+सिगरेटला स्पर्श न करणारी मध्यमवर्गीय माणसे आयुष्य जगतच नाहीत असे 'जजमेंट' देणारे तुम्ही कोण? ही कविता वाचल्यावर कवीच्या मनातील कोळिष्टकेच जास्त दिसतात व या कवितेचा विषय असलेल्या त्या 'न जगणाऱ्या' मध्यमवर्गीय माणसापेक्षा कवीचीच कीव करावीशी वाटते!!
'कॉल द डॉग मॅड अन्ड शूट हिम' ही वृत्तीच ह्या काव्यात दिसून येते.
या कवितेत 'जज्ज,जुरी व पब्लीक प्रॉसिक्युटर' कविच आहे व 'न जगणाऱ्या' मध्यमवर्गीय माणूस आरोपीच्या पिंजऱ्यात आहे.
जगण्याच्या (व पर्यायाने सुखाच्या) कल्पना स्कॉच+मटण+सिगरेट या पलीकडे जात नसतील तर 'देवा, त्यांना क्षमा कर.कारण ते काय जगताहेत/लिहिताहेत ते त्यांचे त्यांना कळत नाही' असेच अत्यंत खेदाने म्हणावेसे वाटते.
आजच्या भोगवादी संस्कृतीप्रमाणे न वागणारी, आपला संसार,जबाबदाऱ्या आपल्या कुवतीप्रमाणे पार पाडणारी माणसे या कवीला  'बावळट' वाटतात तर वाटो बापडी.
मला स्वतःला 'डावी' विचारसरणी अजिबात पटत नाही म्हणून ह्या विचारसरणीची माणसे आपले आयुष्य वाया घालवताहेत असे मी कदापि मानत नाही.

(या कवितेतल्या अनेक उल्लेखांनी व्यथित) जयन्ता५२