. 'विवेक' आणि 'सनातन प्रभात' ची रद्दी ही एक सांकेतिक मानसिकता आहे. ती कळण्यासाठी कविता समजण्याचे किमान ज्ञान हवे.
-- आतापर्यंत माझ्या काही कवितांना आपण व तुमच्या काही रचनांना मी पसंतीचे प्रतिसाद दिले आहेत.त्यामुळे कविता लिहण्याचे व समजण्याचे किमान ज्ञान उभयपक्षाकडे आहे असे गृहित धरायला हरकत नसावी.
पण 'विवेक' आणि 'सनातन प्रभात' ची रद्दी ही एक सांकेतिक मानसिकता आहे ' हे अगम्य आहे.
'विवेक' वाचणारी माणसे चौपाटीवर जाऊन पाणीपुरी न खाणे, सतत गरम पाण्याचा थर्मास बाळगणे, जाग्रणे सोसत नाहीत म्हणून गाण्याचे कार्यक्रम, सिनेमे न बघणे, सतत सावधगिरीची घाबरट, क्वचित भेकड भूमिका घेणे आणि शेवटी आपल्या पोकळ आयुष्याला कृतार्थ वगैरे म्हणणे..अशीच वागणारी असतात हे 'जजमेंटल' नाही का?
स्कॉच, सिग्रेट, मटण या सर्वसंमत, कदाचित उथळ पण प्रातिनिधिक आनंदाच्या कल्पना आहेत.
-- या प्रातिनिधिक आनंदाच्या कल्पना कुणाच्या कल्पनांचे प्रतिनिधित्व करतात?
जर या उथळ आहेत हे मान्य असेल तर या पलीकडच्या खोलवर आनंद देणाऱ्या भावनांची ओळख करून घेण्याची तसदी एक कवी , एक माणूस म्हणून आपण कधी घेतली आहे का?
'विवेक'च्या विचारसरणीचे मा. नानाजी देशमुख यांचे(स्कॉच, सिग्रेट, मटण या सर्वसंमत (?) आनंदाला मुकलेले) जीवनही आपल्यामते 'कृतार्थ' नसावेच.
असो.
(या उत्तराने अधिकच व्यथीत)जयन्ता५२