कविता, प्रकटन काय-म्हणाल-ते मोजून-मापून आहे. छानच. आवडले. 'विवेक' आणि 'सनातन प्रभात' चे उल्लेख फिदीफिदी-हसणे-घेऊ वाटू शकतात.
माझ्याकडून बरेच पैसे उसने घेऊन ते आजवर परत न केलेल्या एका मित्राला बाकी तो मजकूर म्हणजे 'माझ्यातल्या विद्रोही स्फुल्लिंगाचा लयबद्ध आविष्कार' वाटतो.
हा विनोद आहे काय? नसल्यास विद्रोही स्फुल्लिगांचा हा लयबद्ध आविष्कार आहे काय, असा प्रश्न पडतो. उत्तर माझ्यालेखी नकारार्थी.
आपण जगतो तसे इतर जगत नाहीत म्हणून ते तुच्छ असे आपल्याला कधी-कधी वाटू शकते. आणि असे कधी-कधी वाटणे वाईट किंवा चांगले नाही. भलेही आपले विचार साऱ्याच लोकांना आवडणारे, आवडणार नाहीत म्हणून ते मांडायचे नाहीत काय? असो. जजमेंटल होण्यात काहीच अर्थ नाही.
२० जून १९९७ रोजी मुंबई - पुणे प्रवासात मी हे लिहीले होते.
दिनविशेष काय? दिवस २० जून १९९७ चा नसता, ह्या दिवशी कवीने प्रवास केला नसता आणि प्रवास मुंबई-पुणे असा नसता तर कदाचित ही ऐतिहासिक कविता घडली नसती असे कवीला सुचवायचे असावे. बाय द वे, प्रवास बसचा होता की रेल्वेचा? असो. माझ्या मनात भलते-सलते काही-बाही प्रश्न उगाच येत असतात. पण मराठी कवितेच्या इतिहासात ह्या दिनविशेषाची आता नोंद झाली आहे.
चित्तरंजन