-- आतापर्यंत माझ्या काही कवितांना आपण व तुमच्या काही रचनांना मी पसंतीचे प्रतिसाद दिले आहेत.त्यामुळे कविता लिहण्याचे व समजण्याचे किमान ज्ञान उभयपक्षाकडे आहे असे गृहित धरायला हरकत नसावी.

मान्य.
'विवेक' वाचणारी  माणसे ...अशीच वागणारी असतात हे 'जजमेंटल' नाही का?
नाही. ती तसे असतात असे माझे मत आहे हा निष्कर्ष कशावरून निघतो? या कवितेत वर्णन केलेला माणूस तसा आहे, पण 'विवेक' वाचणारा... वगैरे यादीतला प्रत्येक माणूस तसा असतो हा ओढूनताणून काढलेला अर्थ आहे. मला जे अभिप्रेत नाही तेच मला म्हणायचे आहे हे सिद्ध करण्याचा अट्टाहास का?
या पलीकडच्या खोलवर आनंद देणाऱ्या भावनांची ओळख करून घेण्याची तसदी एक कवी , एक माणूस म्हणून आपण कधी घेतली आहे का?
अगदी नम्रपणे होय. माझ्या आनंदाच्या कल्पना दारू, मटण, सिग्रेट यावर सीमित नाहीत. आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो, 'मनोगत' वर मी लिहिलेले लिखाण वाचले तरी हे कळून येईल. अर्थात त्या लिखाणाच्या प्रामाणिकपणाविषयीच शंका असेल तर बोलणेच खुंटले! 
'विवेक'च्या विचारसरणीचे मा. नानाजी देशमुख यांचे(स्कॉच, सिग्रेट, मटण या सर्वसंमत (?) आनंदाला मुकलेले) जीवनही आपल्यामते 'कृतार्थ' नसावेच.
मला वाटते मूळ सल इथे, 'विवेक' च्या उल्लेखात आहे. माझ्या दुर्दैवाने मला भेटलेली सर्व 'विवेकी' माणसे अत्यंत कंटाळवाणी खांडेकरी आदर्शवादाचे भाबडे समर्थन करणारी आणि रूक्ष निघाली आहेत. माझे लेखन हे माझ्या अनुभवावर आधारित असणे स्वाभाविक आहे त्यामुळे हा उल्लेख. त्यांचे जीवन सार्थ आहे का हे मी कसे ठरवणार?

माझ्याकडून बरेच पैसे उसने घेऊन ते आजवर परत न केलेल्या एका मित्राला बाकी तो मजकूर म्हणजे 'माझ्यातल्या विद्रोही स्फुल्लिंगाचा लयबद्ध आविष्कार' वाटतो.

हा विनोद आहे काय?
दुर्दैवाने होय. अमुक एक गोष्ट म्हणजे मी केलेला विनोद आहे हे सांगावे लागावे हे दुर्दैव नाही तर काय? 

भलेही आपले विचार साऱ्याच लोकांना आवडणारे, आवडणार नाहीत म्हणून ते मांडायचे नाहीत काय?

हेच म्हणतो.

दिनविशेष काय?  दिवस २० जून १९९७ चा नसता, ह्या दिवशी कवीने प्रवास केला नसता आणि प्रवास मुंबई-पुणे असा नसता तर कदाचित ही ऐतिहासिक कविता घडली नसती असे कवीला सुचवायचे असावे. बाय द वे, प्रवास बसचा होता की रेल्वेचा? असो. माझ्या मनात भलते-सलते काही-बाही प्रश्न उगाच येत असतात. पण मराठी कवितेच्या इतिहासात ह्या दिनविशेषाची आता नोंद झाली आहे.

आता हा कुत्सित्पणा आहे काय?
असो. चार लोकांना कविता आवडल्याचे समाधान कुणी अकारण (दोनदा) व्यथित झाल्याने केंव्हाच संपले आहे. 'माझ्या बाजूने वाद संपवत आहे' अशा विधानाचे बाकी वेगळे अर्थ निघतात म्हणून मी ही चर्चा माझ्या बाजूने खुली ठेवत आहे.