मला कविता खूपच आवडली. पण आशयाबद्दल आक्षेप आहे.
मला वाटतं की रावांचा रोख हा १. सर्वसामान्य आयुष्य जगणे, आणि २. त्यास असामान्य किंवा कृतार्थ असं स्वतः संबोधणे याकडे आहे. क्रमांक २ बद्दल मी सहमत आहे. आक्षेप क्रमांक १ बद्दल आहे.
माझ्या मते, माझ्यासकट बहुतांशी लोक (यात बहुतांश मनोगतीही आलेच) हे सर्वसामान्यच आयुष्य जगत असतात. "विवेक वाचून" "कानटोपी घालून" "अमृतांजन चोळणाऱ्या" व्यक्तीच्या तुलनेत आपल्या आयुष्यातील चाली धडाडीच्या वाटत असल्या, तरीही आपल्याला उपलब्ध असलेल्या संधी आणि सामग्रीच्या तुलनेत आपली आयुष्यं "अमृतांजनी"च असतात असं मला मनापासून वाटतं. अपवाद अगदी थोडे.
चौपाटीवर भेळ खायला लागणाऱ्या धडाडीचं (हे केवळ उदाहरणार्थ आहे) कौतुक करत बसलो, तर क्रमांक २ चं पाप करूच, पण अखंड आयुष्यच वेगळ्या वाटेने आखणाऱ्यांचा नकळत अपमान करू.
असो.
अवांतर आणि "टँजंट" - कविता वाचून नुकत्याच वाचलेल्या एका वचनाची आठवण झाली. "यू लाफ ऍट मी बिकॉज आय ऍम डिफरंट, आय लाफ ऍट यू बिकॉज यू आर ऑल द सेम!"
- कोंबडी