आणखी एक मुद्दा तुम्ही उल्लेख न केलेला. तो म्हणजे आपल्यालाच काय ते सगळे जग कळते आणि आपल्या शिरावर सर्व जगाला उद्धरून नेण्याची जबाबदारी आहे असे समजून इतरांना ऊठसूट शहाणपणा शिकविण्याचा, (ह्यात मी अन्यत्र म्हटल्याप्रमाणे 'चार पावसाळे' जास्त पाहिल्याचा दावा, हा आणखी एक वैताग असतो) कारण इतर सर्व मूढ आणि हे विद्वज्जड ना. इतरांच्या वैचारीक क्षमतेची संपूर्ण उपेक्षा हा स्थायीभाव.
भाऊसाहेब पाटणकरांनी म्हटल्याप्रमाणे एवढेच म्हणतो
जाऊ सुखे नरकात आम्ही, तेथे तरी येऊ नका.
तुम्ही आमच्यासाठी नरक निश्चित केला आहे ना, मग आम्ही तिकडे जातो. पण च्यायला तिकडे तरी तुमचे उपदेश नको यार.
- (अ-'विवेकी') विचक्षण