चाणक्य महाराज,

असे भाग होणे शक्य नाही.

१) आरक्षणवाले कधीही स्वतंत्र राष्ट्र मान्य करणार नाहीत, कारण तसे केल्याने आरक्षण संपेल कारणं सगळेच आरक्षणवाले मग सवलत कशी मिळेल? ज्याला त्याला जे हवे ते गुणावर व धडाडीवरच मिळवावे लागेल.

२) धर्मावर आधारीत भाग वेगळा करून काहीच साध्य होणार नाही. कारण संपूर्ण धर्माधिष्ठीत लोकसंख्या विनिमय कदापी होणे शक्य नाही काही इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे राहणारच व काही वर्षातच पुन्हा ते हा भेदभाव सुरू करणारच. एका फाळणीचा अनुभव आहेच.

यापेक्षा असलेले अंतर नष्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कुठल्याही प्रकारे जात वा धर्म याचा तोंडी वा लेखी उल्लेख करण्यास मनाई करून संपूर्णतः एकजिनसी व एकजीव समाज निर्माण करणे. पण हेही शक्य नाही, कारण जर जात धर्म संपले तर नेत्यांचे कसे होणार?

हे अमलात आणायला एखादा हुकुमशहाच जन्मावा लागेल.