मला सुद्धा आपले मुद्दे पटले.
स्वातंत्र्य पूर्व काळात नेत्यांच्या एका हाकेसरशी बहुतांश लोक परदेशी राज्यकर्त्यांविरुद्ध एकत्र येऊन लढा देत असत. पण स्वातंत्र्योत्तर काळात संपूर्ण/बहुतांश देशाला अशी एक दमदार हाक देणारा नेता लाभला नाही असे वाटते. हेच लोकशाहीचे यश आणि अपयश आहे असे वाटते.
मला वाटत याचा दोष स्वतःला स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणवून घेणाऱ्या त्यावेळच्या नेत्यांनाच जातो. खास करून गांधीजी गेल्यावर, नेहरू हे एकमेव सत्तेचे अधिकारी बनले. स्वतःचे राज्य समजून त्यांनी लोक हिताची कामे धूळफेकी सारखी केली. जिथे भारताची सर्व प्रकारे नवीन उभारणी करायची होती, पायाभूत सुविधा उभ्या करायला हव्या होत्या ते केलेच नाही.
लोकही फक्त त्यांनीच स्वातंत्र्य मिळवून दिले या समजात आणि तेच देशाचे भले करू शकतात या समजुतीत त्याच घराण्याला सत्ता देत गेले. संधीसाधू लोक त्यावेळी होते आणि आता ही आहेत. ते या सगळ्याचा फायदा घेऊन लोकांना नेहमीच चुकीच्या दिशा दाखवून आपले खिसे भरत आले आहेत. आणि त्यातुनच ही सगळी असमानता वाढली आहे. एकच समाज होण्या ऐवजी आज समाजाचे अनेक वैचारिक तुकडे पडले आहेत.
तुमचा शिक्षणाचा मुद्दा एकदम बरोबर आहे. त्यावेळी त्याचे प्रमाण कमी असल्याने त्यावेळच्या राजकारण्यांनी भरपूर फायदा करून घेतला. आज सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक या वादात न पडता प्रथम सरळ आयुष्या जगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यात जर जास्त क्लिष्टता येऊ लागल्यास ते भारत सोडून जातात.
कदाचित काही दशकांनंतर भारतात फक्त ठराविक समाजाचे आणि मनोवृत्तीचे लोक राहतील आणि नकळतच हि पुनर्रचना झालेली असेल. कदाचित कुठे तरी आपल्याला हवा तसा नवा भारत पृथ्वीच्या पाठीवर कुठेतरी जन्मला असेल...
चाणक्य