श्री. सन्जोप राव,
प्रेमळ नातेसंबंधांच्या ओलाव्याने ओतप्रोत भरलेले आपले लिखाण लेखणीतून/बोटांमधून आलेले नसून थेट मनातून 'मनोगतावर' उमटलेले आहे. जसे, एखादा पट्टीचा गायक मैफिलीतही श्रोत्यांसाठी नाही तर स्वतःसाठी, आत्मिक समाधानासाठी गातो, त्याची समाधी लागते, तद्वत आपले लिखाण एका समाधीअवस्थेत साकार झाले आहे हे ठायी ठायी जाणवते.
अभिनंदन.